Crop Insurance News आता या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात पिक विमा पैसे जमा तुम्हाला मिळाले का ?

Crop Insurance News राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत दिलासादायक बातमी समोर येत आहे. बऱ्याच कालावधीनंतर अखेर शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे. अनेक शेतकरी याकडे आशेने पाहत होते, कारण शेती हेच त्यांचे मुख्य उदरनिर्वाहाचे साधन आहे. हवामानातील बदल, पाण्याचा अभाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीला वारंवार फटका बसतो. अशा स्थितीत पीक विमा हे शेतकऱ्यांसाठी एक मोठे आधारवड ठरते.

Crop Insurance News नुसार, शेतकऱ्यांना यंदा पीक विम्याचे पैसे मिळण्यात विलंब झाला होता. या विलंबामुळे अनेक शेतकरी नाराज होते. मात्र, आता शासनाकडून पैसे वितरित होण्यास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत आपण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम जमा होणार आहे, याची सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

दरम्यान, ATM कार्ड वापरण्याच्या नियमांमध्येही महत्त्वाचा बदल झाला असून, ग्राहकांनी नवीन नियमांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे.

हे पण वाचा :- घराचं स्वप्न पूर्ण होणार! PM आवास योजनेतील या 10 निकषांवर घर अन् 1.20 लाखांची मदत

Crop Insurance News

Crop Insurance बाबत शेतकऱ्यांनी सातत्याने आवाज उठवला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शासनाकडे तातडीने पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेत अखेर विम्याची रक्कम जमा केली जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब फटांगडे यांनी ही माहिती दिली.

फटांगडे यांनी सांगितले की, 2023-24 या वर्षातील पीक विमा लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात तत्काळ जमा करण्यात यावा, तसेच केवळ 1 रुपया भरून विमा संरक्षण मिळावे, यासाठी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडे लेखी मागणी करण्यात आली होती. विशेषतः अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील वर्षीचा विमा अद्यापही मिळालेला नव्हता.

या संदर्भात संघटनेकडून वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाने काही ठोस पावले उचलली नव्हती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी होती. सध्या नैसर्गिक आपत्ती, नापिकी यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट आहे.

अशा कठीण काळात सरकारने सुरू केलेली ‘एक रुपयात पीक विमा योजना’ ही शेतकऱ्यांसाठी फार महत्त्वाची आहे. जर लवकरच रक्कम जमा झाली नाही, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यातील कोणताही शासकीय कार्यक्रम होऊ दिला जाणार नाही, असा स्पष्ट इशारा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. यामध्ये रावसाहेब लवांडे, दत्तात्रेय फुंदे, मेजर अशोक भोसले, प्रशांत भराट, अमोल देवढे, मच्छिंद्र आर्ले, दादासाहेब पाचरणे, नानासाहेब कातकडे, हरिभाऊ कबड्डी, विकास साबळे, नारायण पायगण, मच्छिंद्र डाके, अंबादास भागवत आदींचा समावेश होता.

आंदोलनाच्या इशाऱ्यानंतर शेवटी शासनाने पावले उचलली असून, शेतकऱ्यांच्या खात्यात विम्याची रक्कम जमा होऊ लागली आहे. मात्र सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण भरपाई मिळेपर्यंत स्वाभिमानीचा संघर्ष सुरूच राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी जाहीर केले आहे.

Leave a Comment